आधुनिक ड्रोनची निर्मिती : शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
.नाशिकच्या सारंग माने या तरुणाने आधुनिक ड्रोनची निर्मिती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सारंग यासंदर्भात काम करत होता. या ड्रोनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल फवारण्यासाठी फायदा होणार आहे. सारंगने तयार केलेल्या या ड्रोनला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे.
ड्रोनची वैशिष्ट्ये :
1.या ड्रोनची 16 लिटर कॅपिसिटी आहे.
2. हा ड्रोन वीस फूट उंचीवर जाऊ शकतो.
3. दोन ते पाच किलोमीटर पर्यंत ड्रोनची रेंज आहे. म्हणजे इतकं क्षेत्र तुम्ही फवारणी करू शकतात.
4. या ड्रोनला ऑटो सिस्टीम आहे. एकदा तुम्ही तुमचं फवारणी करण्याचं क्षेत्र रिमोट वरती निश्चित केल्यानंतर ड्रोन ऑटोमॅटिक पूर्ण क्षेत्र फवारणी करेल.
5. या ड्रोनची बॅटरी तुम्ही 900 वेळा रिचार्ज करू शकता इतकी तिची कॅपिसिटी आहे.
6. या ड्रोनच वजन हलकं असल्यामुळे तुम्ही सहज दुचाकी वरती देखील ड्रोन तुमच्या शेतात घेऊन जाऊ शकता.
7. ड्रोन पूर्णपणे रिमोट कंट्रोल आहे. तुम्ही एका जागेवर बसून सर्व ऑपरेटिंग करू शकता.
8. विशेष म्हणजे कोणत्याही लिक्विडची फवारणी तुम्ही या ड्रोनद्वारे करू शकता.
9. तुम्ही दिवसभरात तुमचं कितीही पीक असेल तरी फवारणी करू शकता.
10. चांगल्या प्रतीचा शेतकऱ्यांना फायदेशीर असा हा ड्रोन आहे.
शेतकऱ्यांसाठी खास सूट
शेतकऱ्यांच हित लक्षात घेता हा ड्रोन तयार केला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन कसा परवडेल हे लक्षात घेऊनच किंमत कमी करण्यात आली आहे. साधारण 8 लाख रुपयांचा ड्रोन शेतकऱ्यांना फक्त 2 लाख रुपयांमध्ये विक्री केला जाणार आहे. त्यात शेतकरी गट असेल तर त्यावर 50 ते 75 टक्के सबसिडी दिली जाणार आहे.
जास्त ड्रोन निर्मिती करण्याचे व्हिजन
कृषी उड्डाणमार्फत जास्तीत जास्त ड्रोन निर्मिती करण्याचं व्हिजन आहे. त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हा ड्रोन विकसित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. या ड्रोनने फवारणी केल्यामुळे औषधांची देखील बचत होईल. तसेच हा ड्रोन घेतल्यानंतर शेत माल फवारणी झाला तर इतरांना देखील हा ड्रोन फवारणी करण्यासाठी देऊ शकता. यामुळेपैसे मिळू शकतात.
आधुनिक शेती : शेतात चिया बियाची लागवड, कमी जागेत मिळेल अधिक नफा
आजकाल लोक आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि आरोग्याची खास काळजीही घेतात. व्यायामापासून ते सकस आहारापर्यंत लोक फार सतर्क झाले आहेत. या हेल्दी डाएटमध्ये लोकांनी आपल्या ड्रायफ्रूट्समध्ये चिया बियांचा देखील समावेश केला आहे. याची जगात मोठी मागणी आहे आणि भारतात बाहेरून आयात केली जात आहे. तथापि, अनेक शेतकरी पारंपारिक शेती वगळता नवीनवीन प्रयोग शेतीत करीत असून यात चिया बियांचाही समावेश आहे. पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी चिया बिया देखील लागवड करू शकतात, ज्याला आता सर्वाधिक मागणी आहे
पारंपारिक शेतीला चांगला पर्याय
पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी चिया बिया देखील लागवड करू शकतात, ज्याला आता सर्वाधिक मागणी आहे. खास बाब म्हणजे मागणीबरोबरच त्याचे भावही बाजारात जास्त आहेत, त्यामुळे शेतकर्यांना चांगला नफा देखील मिळतो. त्यामुळे आपण चिया बियाची लागवड करुन कमी वेळेत चांगला नफा मिळवू शकता.
चिया बियाणे म्हणजे नेमके काय?
चिया बियाणे हे इतर खाद्य बियाणा प्रमाणेच आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक आणि औषधी गुणधर्मामुळे खाण्यामध्ये त्याचा वापर करतात. आरोग्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा अधिकचा उपयोग होतो. चिया बियाणांचा आकार खूप बारीक असून बियाणांचा रंग हा पांढरा, तपकिरी किंवा काळा असतो
महागड्या दराने होते विक्री
अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वेळी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. वास्तविक, या बिया 1000 ते 1200 रुपये प्रति किलो दराने ऑनलाईन विकल्या जात आहेत आणि तेही महागड्या दराने शेतकऱ्यांकडून विकत घेतले जात आहे. या बिया फारच लहान दिसतात, ती पांढरी, तपकिरी आणि काळ्या रंगाची असून शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा एक चांगला ऊर्जा स्त्रोत मानला जातो. हे मुळात मेक्सिकन पीक आहे.
कसे सुरू करावे?
पिकाला तणांच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी हाताच्या सहाय्याने शेतात 2-3 वेळा तण काढून टाकावे. शेतात लागवडीनंतर 10-15 दिवसांच्या आत वृक्षारोपणही करावे. त्याची लागवड तयार करण्यास 90 ते 120 दिवस लागतात. चिया बियाणांची लागवड केल्यापासून तीन महिने 15 दिवसांमध्ये उत्पादन मिळते.लागवडीनंतर 40-50 दिवसातच पिकामध्ये फुले येतात आणि 25-30 दिवसांत बिया पिकवून तयार करतात. पीक पिकताना वनस्पती आणि तुरे पिवळे होतात. पिकाची कापणी केली जाते व ती साफ केली जाते व सुकविली जाते आणि बाजारात विकली जाते.
कोणत्या मातीत येते हे पीक?
बर्याच अहवालांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून असे म्हटले गेले आहे की त्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सहज करता येते. तथापि, हलकी माती असलेल्या मातीमध्ये त्याचे पीक चांगले आहे. तसेच यामध्ये कीटकनाशकांची फारशी गरज नसते आणि शेणखतदेखील यासाठी फार प्रभावी आहे.
किती बियाणे आवश्यक?
एक एकरसाठी सुमारे 4-5 किलो बियाणे आवश्यक आहे. यानंतर, एकरी 7 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात याची पेरणी केली तर चांगले उत्पन्न मिळते असे म्हटले जाते.
चिया बियाणांमध्ये औषधे गुणधर्म
चिया बियाणांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, चिया बियाणांमध्ये पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जस्त, तांबे, सोडियम फॉस्फरस, मॅगनिज आदी पोषक तत्त्व असतात. यामुळे चिया बियाणांना अधिकची मागणी असते. विशेष म्हणजे बारामाही महिने या बियाणांना मागणी असते. त्यामुळे दर हे टिकून असतात. कमी वेळेत अधिकचे उत्पन्न यासाठी हा योग्य पर्याय असून या भागातही उत्पादन घेता येत
चिया बियांचे प्रकार
चिया बियांचे मुख्यतः दोन प्रकार आहेत; पांढऱ्या आणि काळ्या बिया, जरी दोन्हीमध्ये पौष्टिक फरक इतका किरकोळ आहे की बहुतेक जण त्यांना पूर्णपणे समान मानतात.
1) काळ्या चिया बिया:
काळ्या चिया बियांमध्ये पांढऱ्या बियाण्यांपेक्षा थोडे अधिक प्रथिने असतात आणि ते पांढऱ्या जातीपेक्षा जास्त उत्पन्न देतात.
2) पांढरे चिया बियाणे:
काळ्या बियाण्यांपेक्षा पांढऱ्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड जास्त असते. हे फरक अनेकदा अगदीच किरकोळ असतात आणि ते सापडतही नाहीत, परंतु सार्वजनिक प्राधान्यांबद्दल, काळ्या बियांचा वापर मुख्यतः बियाणे किंवा तेल म्हणून केला जातो तर पांढरे चांगले पीठ किंवा जेवण बनवतात.
चिया बियांचे फायदे
1. चिया सीड्स हे ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि सहा फॅटी अॅसिडचे समृद्ध स्रोत आहेत जे मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
2. चिया बिया ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करतात.
3. कॅल्शियम आणि मॅंगनीजसाठी शिफारस केलेल्या दैनंदिन सेवनाच्या 18% चीया बियांच्या सर्व्हिंगमध्ये असतात, जे तुम्हाला निरोगी हाडे आणि तोंडी आरोग्य राखण्यास मदत करतात.
4. ते बद्धकोष्ठताचा सामना करण्यास मदत करतात
5. प्रथिने सामग्रीच्या बाबतीत चिया बियाणे जवळजवळ अंड्याच्या मूल्यासारखेच असतात, म्हणून ते शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत बनवतात आणि त्यात कोणतेही कोलेस्ट्रॉल नसते.
6. चिया बियांमध्ये भरपूर फॉस्फरस असते आणि पेशी आणि ऊतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी शरीराला प्रथिने संश्लेषित करण्यासाठी हा घटक आवश्यक असतो.
7. मेक्सिको, अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि पेरूमध्ये चिया बियांचे सर्वाधिक उत्पादन दर नोंदवले जातात.
8. इन्सुलिनच्या प्रतिकाराशी लढा देऊन चियाचा रक्तातील साखरेवर स्थिर प्रभाव पडतो.
9. चिया बिया पूर्णपणे ग्लूटेन मुक्त असतात
10.फक्त एक चमचा चिया बियांमध्ये 5 ग्रॅम फायबर असते.
11.चिया बिया अंड्यांचा उत्तम पर्याय आहेत.
12.फ्लॅक्ससीडपेक्षा चिया बियाणे वापरणे खूप सोपे आहे.
13.चिया बिया हे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत जे मुक्त रॅडिकल्सच्या उत्पादनाशी लढा देतात, जे कर्करोगास कारणीभूत ठरतात.
14.चिया बिया मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तदाब सुधारतात आणि एकूण, एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड कोलेस्टेरॉल कमी करताना चांगले कोलेस्ट्रॉल देखील वाढवतात.
भारतातील कीटकनाशकांची उलाढाल २०२०पर्यंत ४८४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज ‘केन रिसर्च’च्या ताज्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. देशात कीटकनाशकांचा वापर किती व्यापक प्रमाणात आहे, याचा अंदाज येण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. कीटकनाशके, खते, तणनाशके अशा रसायनांच्या शेतीमध्ये होत असलेल्या अनिर्बंध वापरामुळे तयार होणाऱ्या शेतीमालातही त्यांचे अंश उतरतात. जमीन आणि पाण्याचे स्रोतही प्रदूषित होतात. कीटकनाशकाचे अंश असलेले अन्नपदार्थ खाणे मानवी शरीराला धोकादायक असते. हा धोका अगदी कर्करोगासारख्या विकारात परिवर्तित होऊ शकतो किंवा जनुकीय पातळीपर्यंत पोहोचून पुढच्या पिढीत व्यंगही निर्माण करू शकतो. शिवाय मधमाशांसारखे उपयुक्त कीटक मारले गेल्यामुळे, नियंत्रित न होणारी तणे वाढल्यामुळे नैसर्गिक चक्राची हेळसांड होते आहे. भारतीय आंबा, तसेच अन्य शेतीमालाला परदेशातून नाकारले जाण्यासारखे प्रकार रसायनांच्या अतिवापरामुळेच घडतात.
सिक्कीममधील बहुतांश शेतकरी नैसर्गिक शेतीच करत होते. तेथील रासायनिक खतांचा वापर प्रति हेक्टरी केवळ ५.८ किलो एवढाच होता. त्यामुळे खतांचा सर्वांत कमी वापर करणाऱ्या राज्यांमध्ये सिक्कीमचा तिसरा क्रमांक लागत होता. शिवाय १५ हजार हेक्टरवर घेतल्या जात असलेल्या वेलची उत्पादनासाठी कधीही रासायनिक खते वापरण्यात आली नव्हती. तेथील पावसावर केल्या जाणाऱ्या शेतीची उत्पादकता कमी होती. त्यामुळे सेंद्रिय शेती राबवण्यासाठी अनुकूल वातावरण तिथे होते.
राज्याची अत्यंत संवेदनशील अशी परिसंस्था जपण्याच्या दृष्टीने सरकारने राज्यातील सगळीच शेती सेंद्रिय बनवण्याचा मानस २००३मध्ये विधानसभेत बोलून दाखवला आणि त्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये उद्दिष्टे ठरवून नियोजन करण्यात आले. सेंद्रिय शेतीचे धोरण तयार करण्यात आले. १७ सप्टेंबर २००३ रोजी सिक्कीम राज्य सेंद्रिय शेती मंडळही स्थापन करण्यात आले. २००३मध्येच रासायनिक खतांवर अनुदान देणे बंद करण्यात आले. खतांची किरकोळ विक्री करणाऱ्यांना दिले जाणारे वाहतूक, हाताळणी अनुदान आणि कमिशन २००६-०७पासून बंद करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे थांबवून त्या जागी टप्प्याटप्प्याने सेंद्रिय खतांचा वापर केला जाण्यासाठी सात वर्षांचे नियोजन करण्यात आले.
बायो-व्हिलेज विकसित करण्यासाठी गावे दत्तक घेणे, गांडूळ खत तसेच कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी अनुदान देणे, जैविक खते, तसेच प्रमाणित सेंद्रिय खतांची उपलब्धता करणे, यांसारखे उपक्रमसिक्कीम सरकारने राबवले. ‘बायो-व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यासाठी सरकारने २००९पर्यंत शंभरहून अधिक गावे दत्तक घेतली आणि त्याचा फायदा १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झाला. नाझिताम आणि मेलिदारा येथील सरकारी शेतांचे रूपांतर ‘ऑरगॅनिक फार्मिंग सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये करण्यात आले. सेंद्रिय शेतीतील विविध प्रयोग तेथे केले जाऊ लागले आणि त्याची प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना दाखवली जाऊ लागली.
सेंद्रिय शेतीचे मुख्य तत्त्व म्हणजे होता होईतो आपल्या शेताच्या बाहेरील गोष्टींवर अवलंबून राहायचे नाही. म्हणजे काय, तर गायी-गुरांच्या शेणापासून, शेतातल्या काडीकचऱ्यापासून कंपोस्ट किंवा गांडूळखत तयार करायचे, कीटकनाशके वापरायची वेळ आलीच, तर शेताच्या बांधावरच्या कडुनिंबासारख्या झाडांपासून ती तयार करायची, शेतीसाठी लागणारे बियाणे आपल्याच शेतात तयार करायचे, इत्यादी इत्यादी. हीच गोष्ट ओळखून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सिक्कीम सरकारने प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर दिला. शिवाय त्यापेक्षा अधिक जी उत्पादने लागतील, ती सरकारी माध्यमातून विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली. मातीची समृद्धता वाढवण्यासाठी हिरवळीच्या, तसेच जैविक खतांच्या वापरावर भर देण्यात आला. त्याशिवाय बायोडायनॅमिक फार्मिंग, ऋषी कृषी, पंचगव्य शेती, नैसर्गिक शेती आदी पद्धतींमधील काही गोष्टींचाही त्यात समावेश करण्यात आला. बीजनिर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन ते कार्यक्रम राबवण्यात आले. माती परीक्षण प्रयोगशाळा, एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रयोगशाळा, पॅकेजिंग युनिट्स, संशोधन केंद्रे आदींची उभारणी, तसेच प्रशिक्षण आणि क्षमतावृद्धी आणि शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण असे उपक्रम सिक्कीम सरकारने राबवले. त्यासाठी टप्प्याटप्प्याची उद्दिष्टे ठरवण्यात आली आणि ती गाठण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करण्यात आले. सरकारने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी उद्युक्त केले, प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
सेंद्रिय शेतीमालाला नेहमीपेक्षा चार ते सहा पट अधिक किंमत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार; रसायनांचा वापर नसल्यामुळे शेतीत शाश्वतता राहणार; सेंद्रिय शेती पाहण्यासाठी पर्यटनात वाढ होणार; प्रदूषके नसल्याने शेतीमाल आरोग्यदायी असणार; निसर्गाचे रक्षण होणार आणि बाह्य घटकांवरील अवलंबित्व संपल्याने शेतकरी स्वयंपूर्ण होणार, अशा अनेक गोष्टी सेंद्रिय शेतीमुळे सिक्कीममध्ये साध्य होणार आहेत.
सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी प्रयत्न तर हवेतच; मात्र शेतकऱ्यांचीही साथ महत्त्वाची आहे.
सोनचाफा हा चाफ्याचा भारतीय प्रकार भारतात हिमालयापासून तामिळनाडू आणि सह्याद्रीपासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. या वृक्षाचे शास्त्रीय नाव मिकेलिया चंपका (Michelia champaca) आहे. कूल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. सुवर्णचंपक या नावानेही हे फूल ओळखले जाते.
रूप, रंग आणि गंध या सगळ्याच बाबतीत फुलांमध्ये तुलना सुरू केली तर सोनचाफा पहिल्या रांगेत आपले मानाचे स्थान राखून असेल यात शंकाच नाही.अनादि काळापासून भारतीय साहित्य आणि आयुर्वेदात सोनचाफ्याचे संदर्भ सापडतात. सोनचाफ्याचा सुगंध अक्षरश: वेड लावतो. रूप आणि रंगदेखील तसाच मनाला वेड लावणारा. पिवळ्याधम्मक केशर किंवा हापूसच्या आंब्याच्या रंगाची ही फुले खूप सुंदर दिसतात. सफेद, फिक्कट पिवळा ते गडद पिवळा अशा वेगवेगळ्या रंगछटांमध्ये सोनचाफ्याची फुले आढळतात.
१० अंश सेल्सियस तापमानापासून ते ३५-४० अंश सेल्सियस तापमानातदेखील सोनचाफ्याचे झाड उत्तम वाढते. त्याची उंची साधारण ५० मीटपर्यंत असू शकते. सदाहरित असल्याने सावलीसाठी तर हा वृक्ष उपयोगी येतोच; परंतु त्याला येणाऱ्या सुगंधी व सुंदर फुलांमुळे घराच्या, शाळेच्या, मंदिराच्या परिसरात तसेच उद्यानात लागवड करताना सोनचाफ्याला झुकते माप मिळते. याची फुले मोठी असून, देठ छोटा असतो. फुले कधीच गुच्छात येत नाहीत. फुलात लहान-मोठय़ा मिळून साधारण १५-२० पाकळ्या असतात.
या फुलांना खूप सुंदर सुगंध येतो. फुले सुकली तरी हा सुगंध बरेच दिवस टिकून राहतो. हार, वेण्यांमध्ये तसेच आरास करण्यासाठी ही फुले वापरली जातात. या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. अत्तर, अगरबत्ती, साबण यांमध्ये ते वापरले जाते. शिवाय या तेलाचा पुष्पौषधीमध्येदेखील वापर केला जातो. सोनचाफ्याचा आल्हाददायक सुगंध तणाव दूर करून वातावरण प्रसन्न करतो. या झाडाच्या आसपास हा सुगंध नेहमी दरवळत असतो. सोनचाफ्याची फुले आणि कळ्या औषधी असून ती अनेक रोगविकारांमध्ये वापरली जातात. तापविकारावर ही फुले गुणकारी असून जळजळ, मळमळ यांवरदेखील ती वापरली जातात. याच्या कळ्या काचेच्या बाटलीत भरून त्यात पाणी घालून साठविल्या जातात. त्या वर्षांनुवर्षे टिकतात. शोपीस म्हणून या बाटल्या घरात, कार्यालयात ठेवल्या जातात.
सोनचाफ्याची पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. या पानांपासूनदेखील तेल काढले जाते. पोटात होणारी जळजळ तसेच पोटशूळावर पानांचा रस मधातून दिला जातो. तसेच पानांचा काढा सांधेदुखीवर गुणकारी आहे. याच्या झाडाचे खोड मोठे असून त्याचा रंग काहीसा पांढरट किंवा राखाडी असतो. तापविकारांवर याच्या सालीचे चूर्ण वापरले जाते. तसेच मधुमेहावरदेखील याच्या सालीपासून बनवलेल्या काढय़ाचे प्रयोग केले जातात. सोनचाफ्याची मुळे रेचक असून, पोट साफ होण्यासाठी जी औषधे बनविली जातात त्यात यांचा वापर केला जातो.
याचे लाकूड मजबूत असल्याने त्याचा वापर खेळणी आणि शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो. फूल गळून पडले की याला छोटय़ा छोटय़ा फळांचे घोस येतात. प्रत्येक फळात एक बी असते. याच बियांपासून नवीन रोपे तयार केली जातात. सोनचाफ्याचे कलमदेखील करतात. बियांपासून केलेल्या झाडाला फुले येण्यासाठी साधारण १०-१२ वर्षांचा कालावधी लागतो. पण कलमी झाडाला लवकर फुले येतात. साधारण वर्षभर याला फुले येतात. पण पावसाळ्यात विशेष बहर असतो. कळ्या काढायला सोपे पडावे म्हणून याची वाढ नियंत्रित ठेवली जाते. त्यासाठी त्याची छाटणी करतात. पायांच्या टाचांना ज्या भेगा पडतात त्यासाठी सोनचाफ्याच्या बियांपासून औषध तयार केले जाते. सोनचाफ्याची फुले भगवान विष्णूच्या पूजेत वापरली जातात.
इतर पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या देशामध्ये फुलशेती बऱ्यापैकी होत आहे. त्यामध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन, शेवंती, मोगरा, जाई-जुई, लिली यांसारख्या फुलांना फुलांच्या बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असून, आतापर्यंत काहीसे दुर्लक्षित व फुलशेतीमध्ये विशेष लागवड नसलेले सोनचाफ्याचे झाड.
अशा दुर्मिळ सोनचाफ्यांची गुणवैशिष्ट्ये ओळखून त्याची कलमे करून अभिवृद्धी केल्यास अशा जातिवंत कलमांपासून आपणास फुलांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कलमांची लागवड केली असता अशा झाडांपासून लवकर व झाडांची कमी उंची ठेवून आपणास फुलांचे उत्पादन घेता येते. यापासून आपणास फुले विकून पैसे तर मिळतातच, परंतु चाफ्याच्या सुगंधाने मन उल्हसित राहून ताणतणावांपासून मुक्त राहण्याचा आनंद मिळतो तो वेगळाच.
फुलशेतीसाठी सोनचाफा लावताना त्याची निवड करणे हे फार महत्त्वाचे आहे. सोनचाफ्यामध्ये अनेक प्रकार असून, त्यांना फुले येण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. यामध्ये प्रकारांबरोबरच फुलांचा रंगही वेगवेगळा असतो. त्यामुळे फुलांच्या बाजारामध्ये दराचा ग्राहकाचा व टिकाऊपणाचा विचार करून सोनचाफ्याची लागवड करावी. यासाठी गडद पिवळा व गडद केशरी किंवा सिमाचल केशरी यांची कलमे लावावीत.सर्वच चाफ्याच्या झाडांची पाने जवळपास एकसारखीच असल्याने त्यांना जातीनुसार ओळखण्याची सुविधा नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेताळ बांबर्डे गावच्या वेलणकरांनी मात्र त्याचा अभ्यास केला, प्रयोग केले, नवनवे प्रकार सर्वांसमोर आणले. सर्व प्रकारच्या सोनचाफ्यांची फुलांसाठी लागवड करून खास सोनचाफ्याचे शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे
लागवडीचा काळ
पाण्याची बारमाही सोय असल्यास कोणत्याही हंगामामध्ये लागवड करता येते. कलम लावताना खड्डा 60 सेंमी द 60 सेंमी. द 60 सेंमी, असा खणून त्यामध्ये कुजलेले कंपोस्ट खत, गांडूळ खत व शेणखताने अर्धा भरावा. दोन झाडांमधील अंतर 3 मीटर व दोन ओळींमधील अंतर 3 मीटर ठेवावे. कलमाचा डबा अथवा पॉलिथिन बॅग हलकेच काढून मुळांना इजा न करता कलम लावावे. कलमाचा जोड असलेला भाग जमिनीच्या वर ठेवावा, तसेच जोडाजवळ मूळरोपाला येणारे फुटवे वेळोवेळी काढावेत. 3 द 3 मीटर याप्रमाणे लागवड केली असता एका आरला 10 झाडे बसतात. एकरी 400 व हेक्टरी 1000 कलमांची लागवड करता येते.
खते व पाणी व्यवस्थापन
झाडांना वेळोवेळी शेण खत, गांडूळ खत व स्टेरामिल ही खते वाढीनुसार द्यावीत. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. पावसाळ्यात कलमे लावलेल्या जागेमध्ये कोठेही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.एक वर्षानंतर या कलमांना कळ्या येऊन फुले येऊ लागतात. सुरवातीस हे प्रमाण कमी जास्त असते. दोन वर्षांनंतर झाडांची वाढ जोमदार झाल्यावर प्रत्येक झाडाला सरासरी 15 ते 20 फुले येतातच. फुले येण्याचा कमी जास्त काळ वगळता वर्षातून 180 दिवस फुले मिळतात.
तीन वर्षानंतर झाडे चांगलीच जोमाने वाढून फुलांचे प्रमाण वाढते. झाडे अस्ताव्यस्त वाढून दाट होऊ नये यासाठी त्यांची छाटणी करून झाडे लहान ठेवता येतात. यामुळे फुले काढणे सोयीचे होते.
फुलांची काढणी
सकाळी लवकर फुले काढून ती जवळच्या बाजारामध्ये 3-4 तासातच पाठवावी. उन्हाने व धक्क्याने हे नाजूक फूल कोमेजते. यामुळे काढणी व विक्री या गोष्टी त्वरेने होणे महत्त्वाचे आहे. अशा फुलांना व्यापाऱ्यांकडून शेकडा 30 ते 40 रुपये दर मिळतो. सणासुदीच्या काळामध्ये यापेक्षा जास्त दर मिळतो. मेहनत व मशागतीचा खर्च वजा जाता हेक्टरी वार्षिक एक लाख रुपये तरीउत्पादन मिळते. ही फुले दादर, पुणे, स्थानिक फूलबाजारात विकली जातात.
वर्षभर मागणी
>सोनचाफा आणि जास्वंदीला मुंबईच्या दादर फुलबाजारात वर्षभर मागणी असते.
>सोनचाफ्याला किमान ६० रुपये शेकडा ते कमाल ६०० रुपये शेकडा भाव मिळतो. गणेशोत्सव-नवरात्रात वर्षातला सर्वोच्च दर मिळतो.
>सूर्योदयानंतरच सोनचाफा उमलतो. आधी तोडलेल्या कळ्या उमलत नसल्याने चोरीची भीती नाही.
चार एकरांतून थंडीत पाच-सहा हजार आणि उन्हाळ्यात ३०-३५ हजार फुले मिळतात.
Fresh fruit picked from the tree by Israeli robots
The harvest is a stressful time for fruit farmers. After planting, watering and weeding their fields, they need to quickly hire additional workers and coordinate the picking and packing of their crops within a few weeks before the oranges, apples or berries begin to decline in quality.
“This is hard, seasonal work,” says one apple grower in northern Israel, who, like many farmers, also needs to arrange housing, insurance, transportation and work visas for seasonal harvest workers. “Costs are rising all the time.”
Industry experts estimate that about 10 percent of the world’s fruit crops rots on the trees and goes to waste because there are not enough workers to pick it.
It's not uncommon for agricultural technology to be used to increase efficiency in harvesting crops, including fruits. In recent years, Israel has been at the forefront of developing cutting-edge robotics for agriculture, and one such example is the use of robots to pick fresh fruit from trees.
These robots are equipped with advanced sensors, computer vision technology, and machine learning algorithms that enable them to identify ripe fruit and determine the best angle to pick it without damaging the tree or the fruit itself. They can work around the clock, picking fruits much faster and more efficiently than human workers, and can even reach fruits that are difficult or dangerous for humans to harvest.
The use of robotics in agriculture has several potential benefits, including reducing labor costs, improving productivity, and increasing the quality and consistency of the harvest. It also allows farmers to focus on other important tasks such as crop management and maintenance.
While the use of robots in agriculture is still relatively new, it is an area that is rapidly developing and has the potential to revolutionize the industry.
How it works
Fresh fruit picked from the tree by Israeli robots typically involves a multi-step process that requires specialized equipment, software, and skilled operators. Here is a general overview of how it works:
Tree mapping: The first step is to map the trees in the orchard using advanced sensing technologies, such as LIDAR, cameras, and drones. This allows the robots to know the location and size of each tree, as well as the position and ripeness of each fruit.
Fruit detection: Once the trees are mapped, the robots use computer vision algorithms to detect and identify the ripe fruit. This is done by analyzing color, shape, and texture, and making decisions based on pre-set criteria.
Picking: Once the fruit is detected, the robots use specialized end-effectors to pick the fruit gently and efficiently. These end-effectors can be customized to fit different types of fruit and to avoid damaging the trees or the fruit.
Sorting and packing: After the fruit is picked, it is sorted based on size, quality, and other factors, and then packed in crates or containers for shipping. This can also be done by robots, using specialized equipment and software.
Overall, the use of robots in fruit picking can increase efficiency, reduce labor costs, and improve the quality of the fruit by minimizing damage and reducing handling time. Additionally, it allows for greater precision in fruit selection, ensuring that only the ripest and highest-quality fruit is harvested.